निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या सुरजागड खनिजाची वाहतूक बंद करा….युवा सेनेची चेतावणी.

0
269

 

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात अपघाताचे जणू काही सत्रच सुरू असल्याचे चित्र दाखवणाऱ्या सुरजागड खाणीतून निघणाऱ्या ट्रका ह्या लोकांच्या जीवावर बेतल्याचे आता उघडपणे दिसू लागलेले आहेत.

जिल्हाभरात रोज अनेक ठिकाणी होत असलेल्या अपघातात नेहमीच मोठा वाहन हा सुरजागड खनिजाची वाहतूक करणारच असतो. अशा प्रकारे बेधाव पणे चालणाऱ्या वाहनांकडे परिवहन विभागाने तसेच महामार्ग वाहतूक विभागाने मुद्दाम दुर्लक्ष केल्याने आता सर्व सामान्य माणसाचे जीवन आता स्वस्त झाले असल्याचे आरोप युवा सेनेचे अध्यक्ष पवन गेडाम यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

येणाऱ्या दहा दिवसात जर सुरजागड खनिजाची वाहतूक थांबली नाही तर संपूर्ण जिल्हाभरात चक्काजाम करून उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे जवळपास दोनशे किलोमीटर पर्यंत रस्त्याला लागून असणाऱ्या हजारो एकर शेती नष्ट झालेली असून संपूर्ण शेतात लाल धुळीचे चादर पसरल्याचे चित्र जागोजागी दिसत आहेत.त्यामुळे लाखो शेतकरी कुटुंब बरबाद होताना पाहून त्या शेतकऱ्याच्या रक्षणासाठी आता युवा सेना आता मैदानात उतरणार असल्याची माहिती युवा सेनेचे राज्य विस्तारक शुभम सोरते यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत युवा सेनेचे राज्य विस्तारक शुभम सोरते,जिल्हाध्यक्ष पवन गेडाम,गडचिरोली युवासेनेचे तालुका अधिकारी चेतन उरकुडे,युवा सेनेचे शहर अधिकारी वैभव सातपुते, युवा सेना विधानसभा संघटक गणेश धोटे,चामोर्शी युवा सेना तालुका अधिकारी भूषण पोरटे,पीयुष परचाके,हर्षल तांदुळकर हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here