गडचिरोली | प्रतिनिधी
आगामी ६ एप्रिल २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात भाजप शहर आणि युवा मोर्चाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थापना दिन उत्साहात साजरा करण्याबरोबरच पक्षाची विचारधारा आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सविस्तर कार्यक्रम आखण्यात आले.
बैठकीत निर्णय घेण्यात आला की प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर भाजपचा ध्वज फडकवायचा असून “सेल्फी विथ फ्लॅग” या अभियानांतर्गत कुटुंबासह फोटो काढून तो पक्ष नेतृत्वाकडे पाठवायचा तसेच सोशल मीडियावर प्रसारित करायचा आहे. या उपक्रमातून संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दाखवण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे।
५ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यात कार्यालय सजावट, ध्वजारोहण, भित्तीचित्र (वॉल पेंटिंग), कार्यकर्ता मेळावे आणि गावोगावी जनसंपर्क अभियानांचा समावेश आहे।
कार्यक्रमांची रूपरेखा पुढीलप्रमाणे :
१) कार्यालय सजावट (५ ते ७ एप्रिल):
जिल्हा व मंडळ स्तरावरील सर्व कार्यालये तीन दिवस आकर्षक पद्धतीने सजवली जाणार असून विद्युत रोषणाई केली जाईल।
२) ध्वजारोहण (६ एप्रिल):
स्थापना दिनी सर्व पक्ष कार्यालयांमध्ये ध्वजारोहण होईल. यावेळी मिठाई वाटप करून भाजपचा इतिहास, विकास प्रवास आणि शासनाच्या कामगिरीची माहिती दिली जाईल।
३) सेल्फी विथ झेंडा (५ ते १२ एप्रिल):
बूथ स्तरापासून ते जनप्रतिनिधींपर्यंत सर्व कार्यकर्ते आपल्या घरावर ध्वज फडकवून कुटुंबासह फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतील।
४) भित्तीचित्र मोहीम (४ ते १२ एप्रिल):
प्रत्येक बूथ परिसरात किमान पाच ठिकाणी भाजपच्या ‘कमळ’ या निवडणूक चिन्हाची भित्तीचित्रे काढली जाणार आहेत।
५) सक्रिय कार्यकर्ता मेळावे (६ ते ९ एप्रिल):
मंडळ स्तरावर होणाऱ्या या मेळाव्यांमध्ये संघटन विस्तार, निवडणूक तयारी, पक्ष विचारधारा आणि केंद्र सरकारच्या उपलब्धींवर चर्चा होणार आहे।
६) गाव/वस्ती जनसंपर्क अभियान (७ ते १२ एप्रिल):
शहरी भागातील ५० वस्त्या आणि ग्रामीण भागातील ५० गावे निवडून जनसंपर्क मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये स्वच्छता अभियान, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, शासनाच्या योजनांची माहिती आणि लाभार्थ्यांशी संवाद यांचा समावेश असेल।
या सर्व उपक्रमांद्वारे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्याबरोबरच जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला।




