समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना जेवण,पाण्याचे वांदे…. समस्या माझ्या अधिकार क्षेत्रात नसल्याची बतावणी करतात जिल्हाधिकारी…

0
322

Gadchiroli district highlights..7/2/2023

विद्यार्थ्यांनी केला जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध…

गडचिरोली जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या तिन्ही वसतिगृहात विद्यार्थ्यांपुढे खाण्यापिण्याच्या अडचणी सह ग्रंथालय,सामाजिक न्याय विभाग गडचिरोली अंतर्गत सर्व वसतिगृहामध्ये अजूनपर्यंत शैक्षणिक सत्र 2022-23 पर्यंतचा शैक्षणिक भत्ता मिळालेला नसल्याने विद्यार्थांना अनेक आर्थिक समस्या निर्माण होत आहेत.

निकृष्ठ दर्जाचा जेवण,प्राथमिक आरोग्याच्या सोईसुविधा, कायद्यानुसार काहीच योग्य सुख सोई मिळत नाही.अस्वच्छता, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष,नियोजित वेळेवर जेवण नाही,दूषित पिण्याचे पाणी,खेळाचे साहित्य, पालक सभा, वसतिगृहात कर्मचाऱ्यांची कमतरता,ग्रंथालयाची व्यवस्था करण्यात आली नाही.

वसतिगृहात राहणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याने विद्यार्थ्यांना अनेक आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.

एकीकडे मुख्यमंत्री कार्यालय कडे पाठविल्या जाणाऱ्या तक्रारी जिल्हास्तरावर च सोडविणार असल्याची कपोल कल्पित माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती परंतु विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्यावरून पत्रकार आपल्याला प्रश्न विचारतील या भीतीने जिल्हाधिकारी संजय मीना यांनी मुद्दाम पत्रकार परिषदेला पाठ दाखवून निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेडगे यांना पत्रकार परिषद करायला लावली होती हे विशेष…  शेडगे यांच्या वतीने पत्रकारांसमोर माहिती दिली  जात असताना, दुसरीकडे या सर्व अडचणी सोडविण्यासाठी जवळ पास 300 विद्यार्थी, विद्यार्थिनीना जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एक वाजल्यापासून ताटकळत ठेवल्याचा लाजिरवाणा प्रकार आज जिल्हाधिकारी कार्यालयात पाहायला मिळाला. 

सायंकाळी पाचच्या सुमारास काही पत्रकारांच्या,आणि वंचित आघाडीचे नेते बाळू टेंभुर्णी यांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या मांडल्याने अखेर, समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी उद्याला चर्चा करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

स्वतः ला जिल्हाधिकारी कार्यालयाचा सर्वेसर्वा समजणाऱ्या या मुजोर अधिकाऱ्यावर कोणती कारवाई केली जाणार काय..? असा सवाल सामाजिक लोकांकडून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here