“नरोटे-जयस्वाल” जवळीक : राजकीय गरज की आदेश?” “गडचिरोलीत भाजप-शिवसेनेचं ‘नवीन नातं’…जवळीकता जनतेसाठीच का…?

0
252

 “चिपकून का?” – भाजप-शिवसेना युतीच्या गडचिरोलीतील नव्या समीकरणांवर प्रश्नचिन्ह …

 

आज गडचिरोली विधानसभा क्षेत्रात झालेल्या अधिकृत दौऱ्यावेळी एक विशेष दृश्य अनेकांच्या नजरेत भरलं — भाजपचे गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे हे शिवसेना (शिंदे गट) चे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सोबत अगदी “चिटकून” फिरताना दिसले!

 

हेच आमदार नरोटे गेल्या कित्येक सहपालकमंत्री दौऱ्यांमध्ये विशेष सक्रिय नव्हते, काही वेळा अनुपस्थितही राहिले. मग आज अचानक अशी “घनिष्टता” का? हा नवा राजकीय जवळिकीचा अध्याय आहे की पक्षाचा सामूहिक आदेश?

 

भाजप-शिवसेना युती टिकवण्यासाठी हे ‘दृश्य’ तयार करण्यात आले का?

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ‘संवादाचा पूल’ आधीच बांधला जातोय का…? की हेच संकेत आहेत की राज्याच्या नेतृत्वाकडून युती धर्म पाळण्याचे स्पष्ट निर्देश आमदारांना मिळालेत?

एक गोष्ट निश्चित — सामान्य जनतेमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. युतीची जाहीर बैठक नाही, ठोस पत्र नाही, पण अचानक ‘सज्जड उपस्थिती’?

मग जनता विचारतेच – “सत्तेसाठी सत्ताभिमुख, की पक्षासाठी निष्ठाभिमुख?”

वाढत्या राजकीय उकळीमध्ये या “चिटकून” दृश्याने अनेक शक्यता निर्माण केल्या आहेत. पुढचा अध्याय जनतेसाठी स्पष्ट आणि पारदर्शक असावा हीच अपेक्षा!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here