गडचिरोली,ता.९: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मनोज जरांगे, अंजली दमानिया आणि आ.सुरेश धस हे आक्षेपार्ह वक्तव्य करुन वंजारी समाजाची बदनामी करीत आहेत, असा आरोप करीत आज वंजारी समाज सेवा परिषदेच्या वतीने गडचिरोली येथे निदर्शने करुन तिघांचा निषेध करण्यात आला.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मनोज जरांगे, अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस हे वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत असून, चिथावणी देत आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी वंजारी समाजाची भूमिका आहे. मात्र, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आकसबुद्धीने आरोप करण्यात येत असून, वंजारी समाजाची बदनामी केली जात आहे. त्यामुळे मनोज जरांगे, अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वंजारी समाजबांधवांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निदर्शनात चंद्रशेखर भडांगे, सुमित्रा धात्रक, दिलीप आखाडे, प्रा.सुनीता साळवे, पौर्णिमा कहुरके, प्रिया आखाडे, प्रशांत आखाडे, कल्पना धाईत, पौर्णिमा करपे, स्नेहल साळवे, अरुणा कहुरके, कल्पना दांडेकर, मंगला धात्रक, कोमल साळवे, सीमा धात्रक, करिश्मा आखाडे, संजय धात्रक, अनिल साळवे, रोहित गेडाम, राजेंद्र साळवे, वीणा हेमके, विजय साळवे, रोशन हेमके, अनुप साळवे, देविदास आखाडे, प्रशांत बांगर, पवन आखाडे, गजानन साळवे, गणेश तारक, विक्रम गोरे, साहिल आखाडे, योगेश आखाडे, नीलेश धाईत, राजेश साळवे, महेश धात्रक, सूरज धाईत, सुनील कापकर, करुणा कापकर, गायत्री धात्रक, वैष्णवी कापकर, सोमेश्वरी कहुरके, डॉ.साक्षी साळवे, विनय साळवे, अतुल आखाडे, स्वप्नील खांडरे, तेजस साळवे, मंगेश साळवे, अविनाश आखाडे, मनोज दांडेकर, सागर आखाडे, सचिन धात्रक, संतोष करपे, अभिजित दांडेकर, निखिल गोरे, स्वाती करपे, उज्ज्वला करपे, विनय साळवे, संतो्ष धात्रक, दीपक हेमके सहभागी झाले होते.