शरद पवार गटाकडून “आता हक्क मागतोय महाराष्ट्र” मोहीम…

0
156

 

 जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांची पत्रकार परिषदेतून माहिती. 

गडचिरोली:महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये राज्य सरकारच्या विविध खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात पक्षाच्या वतीने हक्क मागतोय महाराष्ट्र ही मोहीम सुरू करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी दिले .

या पत्रकार परिषदेला मनोहर भोयर, विजय गोरडवार, शेमदेव चापले , हुसेन शेख, हिमांशू देशमुख, ऋषभ गोरडवार, वैभव शिवणकर, आदी पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते .

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य दिल्लीसमोर कधीच झुकले नाही. राज्याने देशाला दिशा दिली आहे. गेल्या १० वर्षांत शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार मागे पडला आहे. राज्याला मागे घेऊन जाण्याचे काम भाजपने केले आहे. शेतकरी, नोकरदार, महिला याच्या अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. एकीकडे महागाई वाढलेली असताना दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांची १५०० रुपयांची बोळवण केली जात आहे. राज्यात महागाई, भ्रष्टाचार, घोटाळा, अत्याचार आदी घटनांत वाढ झाली आहे. याविरोधात आम्ही हक्क मागतोय महाराष्ट्र अशी मोहीम राबविणार आहोत. त्यासाठी एक खास गीत तयार करण्यात आले आहे. अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल गण्यार पवार यांनी दिले .

पुढे ते म्हणाले, केंद्राला १ रू जीएसटी देणा-या राज्याला बदल्यात मिळतायेत ७.०६ मग महाराष्ट्राला फक्त ८ पैशांचाच परतावा का ? महाराष्ट्राच्या हक्काचं काय ? , दैनंदिन जेवणाच्या ताटातील पदार्थ ७१ टक्क्यांनी महाग झाले, पण मग वेतन प्रणालीत मात्र ३७ टक्क्यांचीच वाढ का ? सर्वसामान्यांच्या हक्काचं काय ? ३४ लाख कोटीचे उद्योग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेले ३ लाख युवकांच्या हक्काचे रोजगार का हिरावून घेतले? युवकांच्या हक्काचं काय ? अडीच लाख सरकारी पदं रिक्त असतानाही युवकांना बेरोजगारीच्या झळा कशासाठी? बेरोजगारांच्या हक्काचं काय ? इतर राज्यातील पूरग्रस्त शेतक-यांना ३,४४८ कोटींची मदत केली गेली, मग महाराष्ट्रातील बळीराजाला वा-यावर का सोडून देण्यात आलं ? बळीराजाच्या हक्काचं काय ? ना पीकविमा, ना हमीभाव, ना विशेष मदत, दिवसाला का घ्यावा लागतोय शेतक-यांना गळफास ? बळीराजाच्या हक्काचं काय ? महाराष्ट्रावरील कर्ज गेल्या 10 वर्षात २.९ लाख कोटींवरून ७.८ लाख कोटींवर पोहोचवण्याचा अक्षम्य कारभार करून महाराष्ट्राला कर्जबाजारी का गेलं गेलं? , अनुभव नसलेल्या अपरिपक्व व्यक्तीला शिवछत्रपतींच्या पुतळ्याची निर्मितीचे कंत्राट का दिले?

राज्यात दररोज १३० महिलांवर अत्याचार होत आहेत. सत्तेच्या खुचीर्मागे धावणा-यांनी लाडक्या बहिणींची सुरक्षा वाऱ्यावर का सोडून दिली? लाडक्या बहिणीच्या सुरक्षा हक्काचं काय?, एकीकडे शपथविधी सुरु असताना निकृष्ट समृद्धी महामागार्मुळे प्रवाशांचा जीव जात होता, कोस्टल रोड सक्षम नागरी सुविधांच्या हक्काचं काय? या पक्षातर्फे काढण्यात आलेल्या पत्रकातील या मुद्द्यांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here