प्रा.संजय भोयर यांच्या लेखणीतून…
गडचिरोली जिल्हा विशेष….10/3/2023
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात नक्षल्यांची सक्रियता वाढते, जाळपोळ, हत्येचे सत्र सुरू होते. तेंदुपत्ता हंगाम सुरू होण्या अगोदर नक्षल्यांचे हे कृत्य नवीन नाही. त्यामागे आपली आर्थिक झोळी दहशतीच्या जोरावर कशी भरता येईल हे कारण असले तरी यात होरपळला जातो तो निष्पाप आदिवासीं. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मर्दहुर गावचा 26 वर्षीय युवक साईनाथ नरोटे हा आपल्या आयुष्याचे स्वप्न साकार करण्यासाठीं गडचिरोली शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. होळीच्या सणानिमित्त तो मर्दहुर या आपल्या स्वगावी आला. अशातच गुरुवारी रात्रीच्या सुमारास नक्षली गावात आले व पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून त्याची गोळी झाडून हत्या केली. एकीकडे जिल्ह्यात आदिवासींचा आपल्या अस्तित्वासाठीचा संघर्ष सुरू आहे. जल जंगल जमिनीच्या हक्कासाठी तो लढतो आहे. सरकार पुरस्कृत भांडवलशाहिने त्याच्या विस्थापणाचा डाव आखला आहे तर दुसरीकडे आमची आदिवासींच्या हितासाठी लढाई सुरू असल्याच्या बाता मारणाऱ्या नक्षल्यानी स्वतःच्या स्वार्थासाठी साईनाथ सारख्या निष्पाप जीवाचा बळी घेतला आहे. साईनाथ सारख्या अनेक निरपराध आदिवासी बांधवांची पोलिस खबरी असल्याच्या संशयातून हत्या केली.
हजारों वर्षापासून जंगलाचे रक्षण करणारा आदिवासीं बांधव फार मोठ्या चक्रव्युहा सापडला आहे.. जिथे त्याच्या जीवाची किंमत शून्य आहे.