वाघांचा मानवाशी होणारा संघर्ष कसा थांबायचा…

0
302

गडचिरोली लगतच्या ग्रामीण भागात रोज कुणी तरी वाघाची शिकार ठरत आहे. विशेष म्हणजे बैल म्हैस सोडून वाघ माणसाला खात आहे. असली माल खाल्ल्यामुळे माणसाचं मांस कदाचित खूप चविष्ट वाटत असावं वाघाला! बऱ्याच शेतकऱ्यांची शेते आत जंगलात आहेत शिवाय सर्पण किंवा इतर कामासाठी जंगलात शेतकऱ्यांना जावंच लागतं. वाघ दबा धरून झुडपात बसतो आणि बेसावध माणसावर हल्ला करून त्याचे लचके तोडतो. वनखात्याला अनेकदा निवेदणं देऊन झाली पण वाघाचा बंदोबस्त होत नाहीये.

 

नरभक्षी वाघाला शह देण्यासाठी सिमेंटच्या जंगलातील वाघांना पाचरण करण्यात यावं असं आमचं स्पष्ट मत आहे. या निमित्ताने त्यांची पण कसोटी लागेल आणि जातिवंत वाघ कोण ते एकदाचं ठरून जाईल.

 

सरकारी धोरणानुसार माणूस मेला तरी चालेल…..पण वाघाचं संवर्धन आधी झालं पाहिजे असं सरकारचं मत आहे. शेतकऱ्यांने आत्महत्या केली काय किंवा वाघानं त्याला फाडून खाल्लं काय सरकारला काय फरक पडतो?

 

लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. बिचाऱ्या कोविडनं सुद्धा माणसासमोर हार मानलीय! मग वाघाची काय औकात आहे माणसाला संपवण्याची?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here