गेल्या तीन महीन्यापासून दुकानात गहू आलेलाच नाही आठ दिवसात पुरवठा न केल्यास करणार आंदोलन..
गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये मागील तीन महीन्यापासून गव्हाचा पुरवठा होत नसल्याने शेतकरी राजाचा बैलपोळा सारख्या सणासुदीमध्ये गहू उपलब्ध न झाल्यामुळे,
गव्हाच्या पोळीवीना सण साजरा करण्याची वेळ ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नागरीकांवर आली आहे.
गणेश उत्सोवासारखा सण सुरु असतांना गरजू लाभार्थ्यांना राशन दुकानातुन गहू मीळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. सर्व सामान्य नागरीकांना आताच्या वाढलेल्या जीएसटीमुळे गहू व अन्य धान्यावरील दरवाढ अवाक्याबाहेर झाल्याने सामान्य नागरीक गहू खरेदी करु शकत नाही. शासनाकडून गव्हाचा अनीयमीत पुरवठा होत असल्याने ही परीस्थीती उद्भवली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्याना स्वस्त दरातील गव्हांपासून वंचीत राहावे लागत आहे.
जील्ह्यात प्रमाणापेक्षा अधीक पाऊस पडल्याने अतीवृष्टी सारखी परीस्थीती नीर्माण झाली आणि सामान्य कुटुंबातील साठवून ठेवलेला अन्नधान्य पाउसामुळे खराब झालेला आहे, तरीही गडचिरोली सारख्या जील्ह्यात अधीकारी व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. तसेच माहे जुन महीन्याचे पैसे वाला धान्य आणि फ्री धान्य वाटप करायचे आदेश जिल्हापुरवठा अधीकारी यांनी लवकरात लवकर द्यावे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व राशन दुकानाचे लाभार्थ्याना मोफत धान्यांचे कमीशन लवकर अदा करावे.
तरी आठ दिवसाच्याआत राशन दुकानात स्वस्त दरातील गव्हाचे पुरवठा लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा जिल्हा अन्न पुरवठा अधीकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्याता येईल. असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष् लिलाधर भरडकर, तसेच युवक विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, तालुका अध्यक्ष श्रीधर येरावार यांनी इशारा दिला आहे.