प्रबोधन…
“एकत्र कुटुंब पद्धत “ही भारतीय संस्कृती ची शान होती. एकत्र कुटुंब पद्धतीत कुटुबांत एकत्र रहाणार्या प्रत्येक घटकाल मान होता, प्रत्येकाच आगळ वेगळ स्थान होत, प्रत्येकाबद्दल ,एकमेकांना आत्मियता होती. नातू असो, मुलगा असो, बाप असो, आजोबा असो, भाऊ बहिण असो कि काका काकी, प्रत्येकजण एक मेकाचा मान राखीत , जबाबदारीने वागत, एकमेकाला ऊचित मान देत. एकमेकाच्या सुख दुखात सहभागी होत. या एकत्र कुटुंब पद्धतीतला एखादा घटक जर कारण परत्वे दुर गेला तर ते कुटुंब त्याच्या आठवणीने हवालदिल व्हायचे. त्याची ऊणीव सर्वाना भासायची .भावनीक ताकद एकत्र कुटुंब पद्धतीत दिसून यायची. दुर्दैवाने, कारण परत्वे , आज आपण या आनंदाला, या भावनात्मक परिवार पद्धतीला मुकलो आहोत.