प्रबोधन…
दिनांक.12/2/2023
ईश्वराने माणसाला जी जी अवयवे दिली आहेत, त्यातील प्रत्येक अवयव महत्वाचे आहे. शरीर पोषणा पासून तर शरीराची क्रिया – प्रक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी, प्रत्येक अवयव एकमेकाला पुरक असते. कारणपरत्वे, आपल्याला अपघात झाला , आणि या अपघातात, एखाद्या अवयवाला दुखापत झाली, तर ती दुखापत पुर्ण बरी होई पंर्यत यातना सहन कराव्या लागत असतात.
हाताला आघात झाला असेल तर, आपण म्हणतो हाता ऐवजी पायाला जखम झाली असती तर बरे झाले असते. पायाला जखम झाली तर आपण म्हणतो पाया ऐवजी हाताला जखम झाली असती तर बरे झाले असते.
संक्षिप्त स्वरुपात सांगायचे झाल्यास ईश्वराने दिलेला प्रत्येक अवयव महत्वाचा असतो. त्याला तोंड अटवाद असू शकत नाही. तोंड असे अवयव आहे की , या तोंडा द्वारे आपण जो पदार्थ खातो किंवा पितो त्यावर आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते.
अर्थात, तोंड हे अवयव, दातावर, जिभेवर, नाकावर अवलंबून असते. अन्नाची चव जीभेमुळे कळते. चवीवर, अन्न खावे की न खावे हे अवलंबून असते.
खाल्लेले अन्न पचणे गरजेचे असते. . त्यासाठी अन्न चाऊन खाणे गरजेचे असते. त्यासाठी दांत सर्वार्थाने तंदुरस्त असणे क्रम प्राप्त असते. शरीरातील रक्तावर आणि रक्त वाहून नेण र्या धमण्या तितक्याच महत्वाच्या , आहेत जितके ह्रदय आणि फुफ्फुसही महत्वाचे आहेे.
या सर्व अवयवांची जपणूक करण्यासाठी भगवंताने आयुर्वेदात, ऊपाय सांगीतले आहेत. या उपायासाठी, आवश्यक त्या गोष्ठीही निसर्गात ऊपलब्ध असतात , त्या संकलीत करुन ऊपाय योजना करण्या साठी वेळ देणे, गरजेचे असते.