सत्ताधाऱ्यांच्या अनावश्यक खर्चाला  आळा कोण घालणार ?……महेशबाबा घुगे

0
154

प्रबोधन…

स्वतःची छबी सतत जनतेसमोर येत रहावी , आपली लोकप्रियता टीकून रहावी म्हणून सत्ताधारी नेते अनावश्क कारणासाठी , जनतेच्या पैशांची ऊधळपट्टी करित असतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी तर संपूर्ण देशातील प्रसारमाध्यमेच विकत घेतल्याची चर्चा विविध व्यासपीठावरुन होत असते. 

आपली छबी ऊजळून निघावी आणि विरोधकांची मुस्कटदाबी व्हावी म्हणून नरेंद मोदी प्रसार माध्यमांचा आधार घेत असून त्यासाठी जनतेच्या च्या पैशांची ऊधळपट्टी करित असल्याचा आरोप देशातील विविध क्षेत्रातील विचारवंत करु लागले आहेत. 

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री ना. एकनाथ शिन्दे यांनी तर प्रसार माध्यमांवर खर्च करण्याचा ऊच्चांकच गाठला आहे. या ना त्या कारणासाठी, एकनाथ शिंदे, सतत प्रसिद्धिच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करित असतात.

          गेल्या आठ महिण्यातच एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांवर, विकास कामांच्या आधारे जाहिराती देऊन तब्बल 42 कोटी रुपये खर्च केल्याचे माहितीच्या आधारे ऊघड झाले आहे। 

मुख्यमंत्र्यांनी लाओसच्या दौर्या दरम्यान , प्रत्येक दिवशी दहाकोटी , व एकूण चार दिवसासाठी चाळीस कोटी खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे. 

वंचित, शेतकरी, सरकारी कर्मचारी, आरोग्य सेेवक, आदींना त्यांच्या श्रमाचे पैसे द्यायला शासनाजवळ, पैसा नाही, पण ,स्वतःची छबी जपण्यासाठी , प्रसार माध्यमांवर कोट्यावधी रुपयांची ऊधळपट्टी करायला मात्र , पैशाचा तूटवडा नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here