Gadchiroli.date.16/9/2022
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी तर्फे आणि प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शना नुसार आज दुपारी “गाजर लेलो, लॉलीपॉप लेलो” असे उपहासात्मक निषेध आंदोलन घेण्यात आला. महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्र विरोधी सरकार आहे, ह्या ED सरकारचा नवा प्रताप वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सरकार आपल्या मुलाबाळांच्या मुळावर उठलेले आहेत असे आरोप यावेळी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
वेदांत फॉक्सकॉन ग्रुपचा एक लाख 54 हजार कोटी चा प्रकल्प महाराष्ट्र मध्ये तळेगाव दाभाडे येथे येणार होता . तशी ९०% बोलणी आणि तयारी ही झाली होती .परंतु ED (एकनाथ देवेंद्र) ह्या सरकारच्या अकार्यक्षमते मुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न होता गुजरातला पळविण्यात आला. सगळे कसे ok मध्ये… ह्या मुळे महाराष्ट्रातील 1लाख 25000 हजार तरुणांचा रोजगार नष्ट झाला आहे ,हे अतिशय निंदनीय आहे. आधीच कोरोना ने बेरोजगारी वाढली आहे. कमरतोड महागाई झाली आहे. उत्पन्नाची साधने कमी झाली आहेत, अश्यात कुठे रोजगार उत्पन्न होणार ही आशा पालकांना मध्ये आणि तरुणाई मध्ये पालवली असताना, ह्या निक्कम्म्या ED सरकारनी ,आमच्या महाराष्ट्रीयन तरुणांचा रोजगार गुजरात ला पळवून नेला. लाज वाटली पाहिजे ह्या सरकारला असे मनोगत महिला काँग्रेस पक्षाच्या भावणाताई वानखेडे यांनी व्यक्त केले आहे.
“50 खोक्याचे बोके, तरुणानां देतात धोके” हे सगळे करून या सरकार ला समाधान नाही , ह्या ED सरकारचे डोक्यावर पडलेले उद्योग मंत्री उदय सामंत आपल्या महाराष्ट्रीयन तरुणाई च्या तोंडाला पाने पुसत म्हणतात की , युवकांनो तुम्ही घाबरु नका , देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ बाबानां त्यांच्या कानात हळूच असे सांगितले आहे की, वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पा पेक्षा तुम्हाला आम्ही आणखीन मोठा प्रकल्प देऊ काळजी करू नका… ह्या मंत्र्यांना महाराष्ट्राची जनता काय खुळी वाटते का हो. किती खोटे बोलावे त्याला काही सीमा आहे का नाहीं.
हे ED सरकार म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र सरकार मोठा प्रकल्पा येणार असे सांगून खोटी समजूत काढीत एक प्रकारचे गाजर महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील सर्व तरूण पिढीला दाखवीत आहेत. एक प्रकारचे खोटे लॉलीपॉप दाखवीत आहेत. हा एवढा मोठा प्रकल्प गुजरातला का पळविला ह्याचे उत्तर ह्यांच्या कडे नाहीये .आमच्या महाराष्ट्रा बरोबर नेहमीच असा सावत्र व्यवहार ही लोक का करतात? असा प्रश्न महिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष रुपालीताई पंदीलवार यांनी व्यक्त केला आहे.
आमच्या महाराष्ट्रतील सव्वा लाख तरुणांना बेरोजगार करण्याचे हे कट कारस्थान करणाऱ्या सरकार चा आम्ही जाहीर निषेध करतो,आमच्या सव्वा लाख तरुणांचा रोजगार गुजरात ला ED सरकारने पळविला त्याच्या विरुध्द आम्ही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपहासात्मक निषेध आंदोलन केले आहे, शेवटी आमाच्या पोरांना ह्या ED सरकारनी बेरोजगार केले आहे, त्यांचा रोजगार पळविला आहे .तेव्हा ह्या मुलांच्या आया रस्त्यावर उतरणारच ना. आम्ही ह्या डोळे मिटून पडलेल्या सरकार ला आता आई ची ताकत काय असते ते दाखवून देवू असा आक्रोश आंदोलनकरत्या महिलांमध्ये दिसून आला.
आता तरी अंध आणि मंद भक्त जागे होतील.नवीन पिढी निश्चितच ह्या सरकार चे डोके ठिकाणावर आणेल आता, अशी अपेक्षा या आंदोलनात व्यक्त करण्यात आली आहे.