हे कुठवर असेच सुरू राहणार ???

0
242

Gadchiroli.date.15/9/2022

संपादकीय अग्रलेख…

26 आगष्ट 82 रोजी गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. जिल्हा अस्तित्वात येऊन चाळीस वर्षे झाली पण आजही रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे. पाऊस सुरू झाला की, रस्ते पूल वाहून जातात. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडतात. यामुळे आवागमन थांबते. अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होते. नाहक एखादा गरीब निरपराध व्यक्ती मारली जाते ” करे कोई… और भरे कोई ” असा हा मामला आहे.

जिल्ह्याच्या दक्षिण भागातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने शहरात येतात यामुळे रस्ते खूपच खराब झाले आहेत. काल याच कारणामुळे एका गरीब आदिवासी गरोदर महिलेला दामरांचा जवळ अकारण आपला जीव गमवावा लागला. ट्रॅक्टर चिखलात फसल्यामुळे तिला वेळेवर आरोग्य सुविधा मिळू शकली नाही आणि जागेवरच प्राण सोडावा लागला.

 

गाडीची साधी कागदपत्रं नसली की जबर दंड आकारला जातो आणि इथे तर सरळ दोन जीवांची हानी होऊन कुणालाच शिक्षा नाही ही परिस्थिती आहे. यात दोषी कोण तर… खुद मायबाप सरकार आहे! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब म्हणतात, “गडचिरोली जिल्ह्यात पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही! …. खूप सुंदर रोड झाले आहेत!!”…. खरं आहे का हे? तुम्हीच सांगा राव….

 

श्रीनिवास गेडाम

गडचिरोली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here