काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा,
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा , परदेशात जाऊन भारताचा अपमान केल्याचा आरोप करीत , भाजपाने देशभर राहूल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन करणे एक वेळ समजू शकते, पण गुजरात मधील एका सत्र न्यायालयाने राहुल गांधीना दोषी ठरवत , दोन वर्षाची शिक्षा सुनावताच अपीलाची, अपीलाच्या निकालाची वाट न पहाता, निकालाच आधार घेत,राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय , म्हणजे ” ऊतावळा नवरा गुढग्याला बाशिंग ” असा प्रकार झाला. हा भाजपाचा आत्मघातकी निर्णय आहे.
इंदिरा गांधीनी आणीबाणीचा घेतलेला निर्णाय बरोबर होता की चुकीचा हा प्रश्न अलाहिदा, पण त्यांना,, बदल्याच्या भावनेतून जेलमध्ये टाकण्याचा निर्णय निखालस चुकीचा होता.
आणीबाणी ऊठविल्या नंतर देशभर इंदिराजींच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात विरोधकांना अभूतपूर्व यश आले होते. विरोधक तिथेच थांबले असते तर, तर कदाचित त्याच वेळी विरोधकांच्या हातात एकहाती सत्ता आली असती.पण इंदिराजींना तुरुंगात डांबून घोडचुक केली. त्यामुळे देशभर इंदिराजींच्या बाजूने सहानुभूतीची लाट ऊसळली आणि या लाटेत विरोधक वाहून गेलेत व इंदिराजीं बहुमताने पुन्हा सत्तेच्या खुर्चित विराजमान झाल्यात.तीच घोडचुक नरेंद्र मोदी करीत आहेत.
राहुल गाधीनी भारत जोडो यात्रेची घोषणा करताच सताधार्यांनी त्यांची खिल्ली ऊडवली .प्रत्यक्षात यात्रा सुरु होतांना राहुल गांधी यांना मिळालेला प्रतिसाद पहाता भिजपाचे धाबे दणाणले. यात्रेत अडथळे कसे निर्माण होतील याचे गणित आखण्यात आले. तसे डावही टिकले गेले.पण यात्रा जस जसी पुढे सरकत होती तसतसा न भूतो न भविष्यती असा पाठींबा वाढतच चालला होता.
भारतजोडो यात्रेला मिळत चाललेला प्रतिसाद पहाता भाजपच्या तंबूत खळबळ ऊडाली होती. ज्या राज्यात
भाजपची सत्ता आहे ,त्या राज्यातून यात्रा जातांना कायदेशिर अडथळे आणण्याचे हि प्रयत्न झालेत. पण यात्रेत सहभागी होणारा जमाव स्वयंप्ररणेने जमा झालेला होता,त्यामुळे विरोधकांचे प्रयत्न निर्थाक ठरलेत. आणि राहुल गांधीना न भूतो न भविष्यती असे अभूतपूर्व यश मिळाले. त्याची दखल जागतिक पातळीवरही घेतले गेली.त्यामुळे, राहुल गांधीची ऊजळून निघालेली प्रतिमा मलीन करण्याचे आराखडे खुद्द नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आखले जाऊ लागलेत.
त्याचाच भाग , या ना त्या कारणास्तव राहुल गांधी च्या विरोधात वातावरण तापतच ठेवायचे , निमित्त शोधुन , राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलने सुरुच ठेवायचीत असे आदेश वरुन दिले गेलेत. त्यामुळे , राहुल गांधीच्या प्रतिमेला जोडे मारायचे आणि त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढायचा हीणकस प्रकार भाजपाच्या वतीने करण्यात आला.या वर कडी म्हणजे ,सत्र न्यायालयाच्या निकाला नंतर त्याच न्यायालयाने जामिन देऊन, याचिका करण्याची संधी दिली असतांना , तो पंर्यत वाट न पहाता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा घाट बांधला.
परिणामतः राहुल गांधीची प्रतिमा मलीन होण्या ऐवजी त्यांच्या बाजुने देशभरातून , तळागाळातून सहनुभूतीची लाट ऊसळू लागली आहे. त्याचे प्रत्यतंर येत्या सार्वत्रिक निवडणूकीत दिसुन आल्यास नवल वाटण्याचे कारण नसावे.