Gadchiroli.date.14/9/2022
संपादकीय अग्रलेख…
गेल्या दिड दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी वैरागड आणि चातगाव बोदली आदी परिसरात नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातला आहे. दर महिण्यात कुणीतरी वाघाची शिकार होत आहे. लोक तक्रार करतात पण अजुनही वाघाचा बंदोबस्त झाला नाही. वनखाते जंगलात जाऊ नका म्हणते आणि लोक सरपण आदी आणण्यासाठी जंगलात जातातच! गुराखी रोज गुरं घेऊन जंगलात जातो त्याच्यावरही हल्ला होतो. वाघ सहसा माणसाच्या वाट्याला जात नाही पण हल्ली सगळं चित्रंच बदलत आहे.
वाघ निसंदेह माणसापेक्षा बलशाली प्राणी आहे पण माणसाने मनात आणलं तर अख्खी वाघाची जातच धरतीवरून नष्ट होऊ शकते इतकी ताकत माणसात नक्की आहे. जंगलात जाणाऱ्याने एकटं दुकटे जाणे टाळले पाहिजे. बचावा करीता हातात काठी किंवा हत्यार असावे. नुसत्या हाताने तुम्ही प्रतिकार करू शकत नाही. होतं काय की, वाघ दिसताच लोक घाबरून जातात नि कुठलाच प्रतिकार करीत नाही…. मरणार नाही तर काय होणार? आज सुद्धा ताडोबा आणि सावली परिसरात वाघाचा हल्ला झाला होता पण लोकांनी प्रसंगावधान राखून वाघाला पळवून लावलं. ताडोबा परिसरात एकाने बापाचा जीव वाचवला अन सावली परीक्षेत्रात गुरख्यांनी एकत्रितपणे वाघाचा मुकाबला करून वाघाच्या तावडीतून साथीदाराला सोडवलं! जंगलात जायचं तर हिम्मत दाखवावीच लागेल! वाघाशी लढावंच लागेल….अन्यथा जाऊच नका ना जंगलात!
श्रीनिवास गेडाम
गडचिरोली.